कुलभूषण जाधवला फाशी
देण्यास पाकिस्तानला मज्ज्वाव करणारा हुकूम आंतरराष्ट्रीय न्यायालयाचाने दिला.
पराराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज ह्यांच्या आत्मविश्वासाबद्दल आणि न्यायालयात अवघा
1 रुपया फी स्वीकारून भारताची बाजू मांडणारे वकील हरीष साळवे ह्यांचे करावे तितके
कौतुक थोडेच आहे. परंतु कुलभूषण जाधव प्रकरणाचा अंतिम निकाल केव्हा लागेल हे निश्चितपणे
सांगता येणार नाही. हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषणला अटक करण्यात आल्याने त्याला
व्हेनिस कन्व्हेशन कॉन्सुलरच्या कलमानुसार कुलभूषणचा भारताला बचाव करता येणार नाही
अशी भूमिका आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानतर्फे मांडण्यात आली. ह्या मुद्द्याला
पाकिस्तान चिकटून राहणआर हे उघड आहे. त्यात यशही मिळवावे लागेल. परंतु हे
करण्याऐवजी पाकिस्तानी लष्काराने कुलभूषणला फाशी देऊन टाकली तर काय करायचे ह्या
प्रश्नाचे उत्तर आपल्या परराष्ट्र खात्याकडे नाही. अर्थात त्या प्रश्नाचे उत्तर
देण्याचा प्रयत्न हरीष साळवे ह्यांनी केला. साळवे ह्यांच्या मते, दुर्दैवाने
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल लागण्यापूर्वीच पाकिस्तानी लष्कराने कुलभूषणला फाशी
दिले तर सुरक्षा परिषदेत उसळणा-या वादळाला तोंड देणे पाकिस्तानला एकूण कठीण जाईल.
साळवे ह्यांचे उत्तर बरोबर आहे. भारताची बाजू मांडण्यासाठी साळवे ह्यांना सुरक्षा परिषदेत
ह्यांना काही सरकार पाठवणार नाही. हे काम परराष्ट्र मंत्र्याला म्हणजेच सुषमा
स्वराजनाच करावे लागेल हे उघड आहे.  
सरकार स्वतःची पाठ थोपटण्यात मोदी सरकार गर्क
असताना चीनने बोलावलेल्या बेल्ट अँड रोड परिषदेत सामील झालेल्या 60 देशांच्या
प्रतिनिधीत नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तानसारखे सार्क सभासद सामील होतात. आपले
सार्कचे देशही त्या परिषदेला हजेरी लावतात! राजकीय दृष्ट्या
हे चित्र खटकणारे आहे. आशिया, युरोप आणि आफ्रिकेला चीनशी जोडण्याची
महत्त्वाकांक्षा चीनी नेते बाळगून आहेत. इतकेच नव्हे तर चीन-पाकिस्तान
कॉरिडॉरमध्ये भारताला सामील होण्याचेही आवाहनही चीनी नेत्यांना भारताला केले. फार
काय, चीन-पाकिस्तान कॉरिडॉर हे नाव पसंत नसले तर ते बदलून टाकण्याचीही तयारी चीनने
दाखवली आहे. ह्यावर भारताची प्रतिक्रिया काय? भारताला
चीनची योजना मान्य नसेल तर भारताने स्पष्टपणे सांगायला नको? वास्तविक
बेल्ट अँड रोड ही योजना दुस-या महायुध्दानंतर अमेरिकेने पुढे आणलेल्या मार्शल प्लॅनच्या
तोडीस तोड आहे. ती योजना कधीच अमलात आली नाही तो भाग वेगळा. चीनच्या बेल्ट अँड रोड
योजनेतही अनंत अडथळे असून अनेक देशांचा त्याला राजकीय आणि आर्थिक कारणांवरून विरोध
आहे. ह्या योजनेवर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. करणार कशी? भूमिका असेल तर ना! 
रमेश झवर
www.rameshzawar.com
 
No comments:
Post a Comment