Monday, May 30, 2022

‘आधार कार्ड’ झाले निराधार

 मागेल त्याला आधारकार्ड सादर करू नका; आधारकार्ड पडताळून पाहण्याचे लायसेन्स ज्यांच्याकडे आहे त्यांनाच आधारकार्ड दाखवा असे परिपत्रक युनिक थारिटी ऑफ इंडिया ह्या  बंगळूर येथील आधारकार्ड देणा-या स्वायत्त संस्थेने जारी केले होते. ते मागे घेण्याचा तत्काळ सल्ला सरकारने ह्या संस्थेला दिला आहे. हे सगळे प्रकरण घोळ घालणारे होत चालले आहे ह्याचे कारण आंध्रप्रदेश आणि तेंलगण ह्या दोन राज्यात आधारकार्डाचा उपयोग करून अफरातफर झाल्याच्या तक्रारी पोलिसांच्या निदर्शनास आल्या. इतकेच नव्हे तर,  हरयाणा आणि झारखंड  ह्याही राज्यात ओळख पटवण्यासाठी सादर करण्यात आलेल्या आधारकार्ड प्रकरणी झाले!  हे सगळे प्रकार ध्यानात घेऊन युनिक थारिटीकडून परिपत्रक जारी करणयात आले. कळस म्हणजे त्या परिपत्रकालाच फायदा घेऊन आधारकार्ड दाखवण्याची सक्ती बंद पडू नये म्हणून केंद्र सरकारने ते परिपत्रक मागे घेण्याचा सल्ला युनिक थारिटीला दिला. त्याचे कारण असे की अलीकडे बँका, विमानतळे, रेल्वे प्रवासात आधारकार्डाचा सर्रास वापर केला जातो. आधार कार्डाची पध्दतच मुळी ओळखपत्राच्या संकल्पनेतून विकसित झालेली असल्याने लोकांनीही ते स्वाभाविक मानले; स्वीकारले !

आधारकार्डाच्या जन्मापासूनच आधारकार्डाला ग्रहण लागले. जनगणना महासंचालकांनीच हे कार्ड नागरिकत्वाचा पुराला मानता येणार नाही असा आक्षेप नमूद केला.  न्यायालयात आधारकार्डाच्या मुद्द्यावरून उदंड खल झाला होता. शेवटी आधारकार्ड जिंकले, आधारकार्ड जारी करणारे जिंकले. मात्र, आधारकार्डधारक मात्र अचणीत सापडले. बँकांचे एक समजू शकते, नेटबँकिंग करणा-या ग्राहकाला, पेन्शन मंजूर करताना आणि तसे मंजुरीपत्र देताना आधआरकार्डाची सक्ती करण्यात आली. त्याखेरीज  हॉटेले, पर्यटण व्यावसायिकांनीदेखील आधारकार्डाचा स्वेच्छा वापर सुरू केला. त्यात गैर असे काहीही नाही. खोटे नाव सांगून हॉटेल बुकिंग करू शकणा-यांना आधआरकार्डामुळे आपोआपच आळा बसला होता. ज्या पार्टीच्या नावे हॉटेल वगैरे बुक करायचे असेल त्याला ऑनलाईन आधारकार्डचा नंबर किंवा पर्यटण संस्थेच्या एजंटाला आधारकार्डाचे झेरॉक्स सादर करावे लागत होते. अजूनही ते करावे लागते. परंतु आधारकार्ड देणा-या स्वायत्त संस्थेच्या ताज्या परिपत्रकानुसार आधारकार्ड दाखवण्याचे बंधन राहणार नाही. किंवा तिकडे साफ दुर्लक्ष केला जाण्याचा संभव वाढू शकेल. केंद्र सरकारच्या हे ध्यान्यात येताच परिपत्रक मागे घेण्याचे केंद्र सरकारकडून युनिक थारिटीला सांगण्यात आले.

ह्या प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा असा की आधारकार्डाची पडताळणी करण्यासाठी आंगठा किंवा संपूर्ण पंजा स्कॅन करण्याची वेळ कधी कधी संबधितांवर येते. ह्यामुळेही ओळख पटली नाही तर डोळ्यांवरूनही ओळख पटवण्याचे प्रगत तंत्र अवलंबावे लागते! हे प्रकरण अधिकाधिक घोळ वाढवणारे झाले आहे ह्यात शंका नाही. आता ह्या प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा असा की आधारकार्डाची पडताळणी करणा-यांकडे त्याचे लायसेन्स आहे की नाही हे कोण पाहणार? वर्तमानपत्रात कितीही मोठमोठाल्या बातम्या छापून आल्या तरी पडताळणी करणारे तिकडे दुर्लक्ष करतील.  अशा तर्हेने ज्या संस्थांना खरोखऱच आधारकार्ड तपासून पाहण्याची गरज आहे त्यांची अधिक अडचण होणार आहे. आधारकार्ड पडताळणीचे अधिकृत लायसेन्सदार असल्याचा फलक दर्शनी जागेवर लावण्याची सक्ती बँका, विमानतळे वर केली जात नाही तोपर्यंत आधारकार्ड दाखवण्याची गरज नाही, अशी भूमिका कायदेबाज मंडळींनी घेतल्यास त्या आक्षेपाचे निराकरण करणे जवळ जवळ अशक्यप्रायच.  ह्याखेरीज वर्तमानपत्रातून लायसेन्सदार संस्थांच्या नावांची जाहिरात प्रसिध्द करण्याचे बंधन आधारकार्ड जारी करणा-या युनिक थारिटीवर घालावे लागेल.

हे सगळे लक्षात घेता आधारकार्डाचा फियास्को होणार अशी लक्षणे दिसत आहेत! सध्याची व्यवस्था सुरळितपणे चालू राहिली पाहिजे अशी सरकारची इच्छा असल्यास तातडीने पावले टाकणे सरकारला भाग पडेल. अन्यथा आधारकार्ड निराधार झाल्यात जमा आहे.

रमेश झवर

Sunday, May 22, 2022

पवारांचे खडे बोल

स्वपक्षियांना जातीविरोधी  वक्तव्ये  करण्याचा जाहीर सल्ला देऊन ज्येष्ठ नेते शरद पवारांनी ब्राह्मणांची मने जिंकली की नाही हे कळण्यास मार्ग नाहीसेवा आणि नोकरीच्या क्षेत्रात ब्राह्मणनर्ग बहुसंख्येने आहेपण म्हणून त्यांची आरक्षणाची मागणी मान्य करता येणार नाही हेही पवारांनी ब्राह्मणवर्गाच्या निदर्शनास आणून दिलेत्याचवेळी कोणालाच आरक्षण नको की ब्राह्मण महामंडळाच्या मागणी मात्र त्यांनी बैठकीतच फेटाळून लावली.  सामान्यतराजकारणी मंडळी ह्या प्रश्नावर गुळमुळीत बोलून वेळ मारून नेतातपवारांनी मात्र तसे केले नाही. ब्राह्मणांच्या प्रश्नावर पवारांची घेतलेल्या भूमिकेने त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची झलक महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

ब्राह्मणवर्ग देशभरात पसरलेल्या आहे. तरीही प्रत्येक प्रांतातल्या ब्राह्मणवर्गाची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेतस्थूल मानाने असे म्हणता येईल की ब्राह्मणवर्गदेखील जातीपोटजातीत विभागला गेलाप्रत्येक पोटजातीचे हितसंबंध वेगवेगळे आहेत हे ओघाने आलेचपूर्वीच्या काळी ब्राह्मणवर्ग हा पंचगौड आणि पंचद्रविड ह्या दोन प्रमुख वर्गात विभागलेला होतादोन वर्गात विभागलेला ब्राह्मणवर्ग प्रांतपरत्वे हळुहळू आणखी वेगवेगळ्या पोटजातीत विभागला गेलागेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात समस्त ब्राह्मणवर्गाची एकजूट घडवून आणण्याचे प्रयत्न यशस्वी झालेब्राह्मण महामंडळ हे त्याचेच फळ आहेपूर्वीच्या मुंबई प्रांतात थेट कराचीपासून कर्नाटकापर्यंत सुमारे  हजार जातींची नोंद करण्यात आली आहे. त्याखेरीज लग्नकार्यासाठी बहुतेक जातींनी त्यांच्यातल्याच एका ज्ञानी माणसाला ब्राह्मणाचा मान देण्याची प्रथाही सुरू केली.  ह्याचा अर्थ ज्ञानार्जन करणा-या सर्वांनाच ब्राह्मणाइतकाच मान मिळतो!  

मुळात वैदिक संस्कृतीत आर्य टोळ्यांतील ज्यांनी स्वकियांच्या रक्षणाची जाबबादारी पत्करली ते आपोआपच क्षत्रिय ठरलेज्यांनी तपश्चर्या करून  ज्ञानमार्गा वाटचाल केली ते आपोआपच ऋषी झालेऋषींवर्गातही मतभेद होतेच. विशेषतः लोपामुद्राने तिचा स्वतंत्र आश्रम स्थापन केला होता. अनेक ऋषींशी तिचे मतभेद होते. दस्यू सरसकट खलप्रवृत्तीचे नाहीत असे तिचे मत होते.

 विशेषतः द्रविडांशी कशा प्रकारचे संबंध ठेवावेत ह्यावरून त्यांच्यात मतभेद होतेभृगू कुळातले ऋषी हे लढवय्येही होतेशरादपि शापादपि’ असा त्यांचा बाणा होता. आर्यांना मान्य असलेल्या शाश्वत जीवनमूल्यांचे जो पालन करतो तोकृष्णवर्णीय द्रविड का असेना. तो खराखुरा आर्य अशी परशुरामाची भूमिका होती. आर्यांची जीवनमूल्ये फारशी न पाळणा-या सह्स्रार्जुनाने परशुरामला कैद करून  नर्मदेपलीकडे असलेल्या त्यांच्या राज्यात आणले होतेपुढे परशुरामाने स्वतःची सुटका करून घेतलीसुरूवातीला भार्गवरामाचे वास्तव्य अनुप देशात म्हणजे आताचे गुजरात ) होतेतो थेट  कोकणातील चिपळऊण पर्यंत आला होता चिपळूण – गुहागर परिसरात उभारण्यात आलेले परशुरामाचे देऊळ आजही दिमाखाने उभे आहेपश्चिम रेल्वेवरील भडोचचे मूळ नाव भृगूकृच्छवरून पडले असावे. अनेकांनी ऋग्वेदकालीन इतिहासाचे संशोधन केले. ह्या बाबातीत पाश्चात्य विद्वानांनी जितका पुढाकार घेतला तिकाच पुढाकार मराठी विद्वान संशोधकांनीही घेतलात्यांच्या  संशोधनाविषयी आताच्या पिढीला पारशी माहिती नाही. यज्ञयागाचे कर्मकांड सुरू झाल्यानंतरच्या काळात ब्राह्मणांना अधिक मानाचे स्थान प्राप्त झाले. असो.

शरद पवार हे मुरब्बी राजकारणी आहेतब्राह्मण महामंडळाच्या वतीने आयोजि करण्या आलेल्या बैठकीचा त्यांनी अचूक फायदा घेतला. त्या निमित्ताने स्वपक्षातल्या काही नेत्यांना जाहीररीत्या खडे बोल सुनावण्यास  त्यांनी कमी केले नाही!

रमेश झवर



Monday, May 16, 2022

हुसेन दलवाई

 काँग्रेसचे  माजी  खासदार हुसेन दलवाई ह्यांनी सोमवारी ह्या जगाचा नरोप घेतला. ९९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या दलवाईंची आणि माझी ओळख होण्याचे कारण नाही. त्यांच्याशी संबंधित बातम्या रिपोर्टरने माझ्या चेबलावर आणून दिल्यावर त्या फक्त शुध्दलेखनाच्या चुका तपासून कंपोजला पाठवणे एव्हढेच माझा काम. परंतु त्यांच्याविषयी माझ्या मनात मात्र एक प्रकारचे कुतूहल होते. एके दिवशी चर्चेत भाग घेणअयाचे निमंत्रण मला आले. तेही चर्चेत सहभागी झाले होते. चर्चेचा विषय काय होता हेही मला आठवत नाही. एक मात्र लक्षात राहिले की त्यांचा मुद्दा संपल्यावर तोच धागा पकडून मी माझे मत मांडत राहिलो!

चर्चा संपल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. दुस-या दिवशी मला फोन आला. दरम्यान त्यांनी कुछून तरी माझा नंबर मिळवला असावा.

मी दलवाई बोलतोय्. तुम्हाला वेळ असेल तर या एक दिवशी गप्पा मारायला.

केव्हा? आज आलो तर चालेल? ‘

या ना.

त्याच दिवशी मी दुपारी चारच्या सुमारास मी त्यांच्या चर्चगेट निवासस्थानी हजर झालो. त्यांनी हातात हात घेऊन माझे सप्रेम स्वागत केले. उत्कृष्ट  मराठीत त्यांनी जुन्या आठवणींचा पट उलगडला. माझ्यासाठी टिपीकल स्वीट डिश- खुर्मा- मागवला. वास्तविक त्या दिवशी सण वगैरे नव्हता. ह्याचा अर्थ त्यांनी ती डिश माझ्यासाठी बनवायला सांगितली असणार!

दलवाईंना संसदीय कामकाजाचा अफाट अनुभव होता. तारांकित आणि अतारांकित प्रश्न, अल्पमुदतीची चर्चा, स्थगन प्रस्ताव ह्या सर्वांचा उद्देश एकच: सरकारने माहिती दडवण्याचा प्रयत्न करू नये. कितीही अडचणीचा प्रश्न असला तरी मंत्र्यांनी लोकप्रतिन लोकप्रतिधींपासून सार्वजनिक हिताची माहिती दडवून ठेऊ नये!  माझे आणि त्यांचेही घड्याळाकडे लक्ष नव्हते. नंतर माझ्या लक्षात आले दोन तास झाले तरी आपण अखंड गप्पा मारतोय्!

असे माझे गप्पांचे सत्र महिन्यातून एकदा तरी चालायचे. एक दिवशी त्यांना मला विचारले, तुम्ही कुठे राहता? मी ठाण्याला राहतो हे त्यांना धक्काच बसला.

`मला वाटलं, तुम्ही जवळपास म्हणजे गिरगाव वगैरे ठिकाणी राहात असाल.’

नाही हो, गिरगावला राहणा-या पत्रकारांचा जमाना आता संपला. १९६५ नंतर मुंबईला आलेल्या पत्रकारांना बांद्रा-कुर्ल्याच्या पलीकडे राहायला मिळालं तरी खूप झालं! ‘

नंतर नंतर त्यांच्या आणि माझ्या भेटी कमी होत गेल्या. आज त्यांच्या मृत्यूची बातमी जेव्हा ऐकली तेव्हा लक्षात आलं आता काळ स्वतः अनंत असला तरी शरीरधर्म सोडायला तो कोणालाही परवानगी देत नाही.

रमेश झवर