Saturday, May 25, 2019

जवाहर मुथांनी वर्तवले मोदींचे भविष्य


ज्योतिष शास्त्र भारतीय जनमानसात किती लोकप्रिय आहे ह्याची कल्पना आताच्या विज्ञाननिष्ठ पिढीला येणार नाही. आधीच्या पिढीत ज्योतिषाला विचारल्याखेरीज काही न करण्याचे धोरण अनेक कुटुंबात होते. ज्योतिषशास्त्र हे वेदांग असून त्याला जगभर मान्यता  आहे. गणित ज्योतिष आणि फलज्योतिष हे ज्योतिषशास्त्राचे ठळक भाग असले तरी दोन्ही भागात पारंगत असलेले ज्योतिषी फार कमी भेटतात. फलज्योतिष जितके लोकप्रिय आहे तितके गणित ज्योतिष लोकप्रिय नाही. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात गणित ज्योतिषाने फार मोठी कामगिरी बजावली आहे. भगवान श्रीकृष्ण भागवत आणि महाभारत ह्या दोन ग्रंथातले व्यासांनी निर्मिलेले काल्पनिक पात्र ऩाही तर श्रीकृष्ण प्रत्यक्षातली व्यक्ती होती असे गणित ज्योतिष्याचे अभ्यासक म्हणतात. भारताचार्य चिंतामणराव वैद्यांनी तर गणित ज्योतिषाच्या आधारे श्रीकृष्णाची जन्मतिथी आणि मृत्यूतिथी शोधून काढली. श्रीकृष्णाच्या आयुष्यातील घटनांचा तारीखवार ताळा जळवून दाखवला आहे. महाभारतातील 'हा सूर्य हा जयद्रथ' ह्या कथेवरून. महाभारत युध्दाच्या नेमक्या तारखाही मराटी विद्वानांनी शोधून काढल्या आहेत.
बहुतेक मराठी लेखकांच्या चरित्रे-आत्मचरित्रात लेखकाच्या जन्मकुंडलीचा आवर्जून समावेश करण्याची पध्दत होती. ज्योतिषशास्त्राची मराठी लेखक-पत्रकारांनी कितीही टवाळी केली तरी ऑफिसमधील त्यांच्या टेबलाच्या खणात स्वतःची जनमपत्रिका हमखास सांभाळून ठेवलेली असते. एखादा ज्योतिषी भेटला तर त्याला भविष्य विचारण्यासाठी पत्रिका हाताशी असलेली बरी! अनेकांची तर जन्मपत्रिका तोंडपाठ असते. अलीकडे दोन मिनीटात जन्मपत्रिका तयार करणारी सॉफ्टवेअर बाजारात आल्याने पत्रिका बाळगण्याची गरज राहिली नाही. फक्त जन्मवेळ, जन्मवर्ष जन्मगाव माहित असले तरी पुरे. आज चंद्र कुठल्या राशीत आहे हे वर्तमानपत्रात पाहता येते. तसे ते कालनिर्णय वा महालक्ष्मी भिंतीवरील दिनदर्शिकेतही पाहता येते. मुंबई, पुणे, ठाणे डोंबिवली इत्यादि अनेक शहरात ज्योतिषशास्त्राचे क्लासेस धूमधडाक्यने चालतात. पत्रिका पाहून निर्णय घेणा-यांची कितीही टवाळी केली तरी मुलीचे लग्न जमवताना समोरच्या व्यक्तीने पत्रिका जुळवून पाहून मगच पुढची बोलणी असा आग्रह धरणारे भेटले की त्यांचा आग्रह मोडून काढण्यापेक्षा चांगले स्थळ जाऊ हातचे जाऊ द्यायला अनेक जण तयार नसतात. निवडणुकीला यश मिळेल का, उभा राहू का,  लांबच्या प्रवासाला निघायला कुठला काळ चांगला राहील, परदेश प्रवासाचा योग आहे का, तब्येतीला केव्हा आराम पडेल ह्यासारखे प्रश्न सुशिक्षित बुध्दिजीवींच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा उपस्थित होतातच. तत्वनिष्ठ भूमिका घेणारे फार थोडे. पत्रिका पाहण्याच्या 'प्रॅक्टिकल' मार्ग स्वीकारणारे बहुसंख्य असतात.
भविष्य जाणून घेणारे अनेक प्रकारचे लोक आहेत. काही जणांना काम केव्हा होईल हे जाणून घ्यायचे असते तर काहींना एकूण आयुष्याचा काळ कसा जाणार हे माहित करून घ्यायची उत्सुकता असते. क्लाएंटच्या गरजेनुसार प्रश्नकुंडली मांडणारे, कृष्णमूर्ती प्रणालीत अतिशय सूक्ष्तात जाऊन पत्रिकेचे तपशीलवार विश्लेषण करणारे, दशा वगैरे पाहणारे आहेत. भविष्य अनेक प्रकारे पाहिले जाते. अन्य शास्त्रातल्याप्रमाणे ज्योतिषातही मतभेद आहेत. मेदिनीय ज्योतिष वेगळे. पाऊसपाण्याचे भविष्य वेगळे. एखाद्या भूभागाचे भविष्य वेगळे! काही ज्योतिषी फक्त शुभ मुहूर्त काढून देतात. तेवठेच काम हे ज्योतिषी करतात. फलज्योतिषाखेरीज हस्तसामुद्रिक, रमल, टारो, पोपटाकडून कार्ड उचलायला लावून ते वाचून दाखवणारेही ज्योतिषीच. ग्रामीण भागात पंचर्षी, वायुदेव गावात फिरतात. अतिशय गरिब असलेल्या लोकांची ते सेवा करत आले आहे. थोडक्यात, भविष्यकथनाच्या नाना प्रकारच्या पध्दती अस्तित्वात आहेत. कोणते रत्न लाभदायक ठरेल हेही सांगितले जाते. पत्रिका बघून उपाय सुचवणारेही अनेक ज्योतिषी आहेत. ते आंगठ्या खरेदी करतात. खडे खरेदी करतात. काही जणआंना बुवामहाराजांच्या दर्शनाला जाण्याचा सल्लाही दिला जातो. बुवामहाराजांचे आशिर्वाद घेणा-या राजकारण्यांची संख्या खूप मोठी आहे!
ह्या विषयावर मुद्दाम लिहण्याचे कारण असे की लोकसभा निवडणुका जाहीर होताच कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, कोणाचे सरकार येईल वगैरे भाकित देशभरात सुरू झाले. पंतप्रधान मोदी ह्यांना दणदणीत यश मिळेल असे भविष्य ख्यातनाम पत्रकार प्रा. जवाहर मुथा ह्यांनी वर्तवल्याची मला आठवण झाली. विशेष म्हणजे त्यांचे भविष्य तंतोतंत खरे ठरले. भविष्यकथन करताना त्यंनी वर्तमानपत्रांच्या माहितीचा उपयोग करण्यऐवजी फक्त पत्रिकेतल्या ग्रह     ता-यांचाच विचार केला. ते पत्रकार आहेत. ज्योतिषाचा अभ्यास हा त्यांचा छंद आहे. भविष्यकथनाची त्यांना आवड आहे. प्रा. मुथा हे किर्लोस्कर मासिकात साह्ययक संपादक होते. किरलोस्करची नोकरी सोडल्यावर नामवंत शिक्षण संस्थात त्यांनी प्राध्यापकाचे काम केले. साहित्य, शिक्षण, राजकारण, पत्रकारिता इत्यादि अनेक क्षेत्रात त्यांनी कार्य केले. नेहरूंच्या दिमतीला काँग्रेसतर्फे जे स्वयंसेवक देण्यात आले होते त्यात एक स्वयंसेवक ह्या नात्याने त्यांनी काम केले. त्य वेळी त्यांना नेहरूंशी बातचीत करण्याचीही संधी मिळाली होती. सामाजिक संस्थात काम करत असताना ओशो रजनीशना स्टेशनवरून मुक्कामाच्या ठिकाणी आणण्याचे काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती! महत्त्वाचा मुद्दा असा की ते चर्तुस्त्र आहेत. अनेक प्रकाची कामे करण्याचा उदंड अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. नगरमध्ये ते स्वतःचे साप्ताहिक चालवतात. महाराष्ट्र ज्योतिष संशोधन केंद्राचे ते अध्यक्षही आहेत.
निवडणूक जाहीर होताच त्यांनी मोदींच्या विजयाचे भाकित केले. मोदींच्या विजयाचे भाकित करताना त्यांनी म्हटले होते, 'लोकसभेच्या देशातील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा 'राहू काल 'होता. आणि 'राहू 'हा ग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रिकेत अतिशय चांगल्या प्रकारे असल्याने तेच भारतातील निवडणुका जिंकतील, याची ग्वाही मी देत आहे.'
हे भविष्य त्यांनी व्टीट केले होते. फेसबुकवरही पोस्ट केले. त्याची लिंक: ttps://m.facebook.com/story.php?story_fbid=2220843818035843&id=100003307382819
रमेश झवर

No comments: