Saturday, February 20, 2021

उत्क्रांतीचे चित्रण करणारी कादंबरी- ‘बदल’

विठ्ठलरूपाने
 पंढरपुरी विटेवर उभा असलेला श्रीकृष्णस्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराजटिळक-आगरकरांचे लेख आणि फुले-आंबेडकरांच्या जीवनकार्याने महाराष्ट्रावर गारूड केलेकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार तर विठ्ठल हा चोवीसावेगळा’ अवतारशिवाजीमहाराजांच्या स्वराज्यस्थापनेमुळे देशात मराठेशाही  स्थापन झालेमराठी अस्मितेचाही नव्याने उदय झाला तर पंढरपूरच्या वारीमुळे महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाही अवतरलीइंग्रजी राजवटीत टिळकांच्या जहाल विचारांमुळे पारतंत्र्याविरूध्द असंतोष जाग- झालासुधारकातील आगरकरांच्या अग्रलेखांमुळे सामाजिक सुधारणांची मनोभूमिका तयार झालीह्य सगळ्याचा परिणाम लगेच दिसला नाही.  त्यांच्या विचाराचा परिणाम व्हायला थोडा काळ उलटावा लागलासुमारे ५० वर्षांत समाजात स्थित्यंतर सुरू झालेफुले-आंबेडकरांच्या विचाराने तर समाज अक्षरशः ढवळून निघालाह्य सगळ्याचा प्रभाव इतका सूक्ष्म होता की सुरूवातीला तो अनेकांच्या लक्षातही आला नाहीशिवाजीमहाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा परिणाम त्यांच्या  मरणानंतर दिसलाटिळक-आगरकरांचा आणि फुले आंबेडकरांचाही प्रभाव मराठी मनावर निश्चितपणे पडलापण तो खोलवर रूजायला काही वर्षे गेलीहे सगळे लिहण्याचे कारण महाराष्ट्रात क्रांती घडली नाहीघडली ती उत्क्रांतीउत्क्रांती हळुहळू घडतेउत्क्रांतीची संकल्पना म्हणजेच बदल!  ‘बदल’ ह्या मध्यवर्ती संकल्पनेवर डॉगिरीश जाखोटिया ह्यांची कादंबरी नुकतीच माझ्या वाचनात आलीडॉजाखोटियांच्या मते गेल्या ३० वर्षात जग वेगाने बदललेहा बदल महाराष्ट्रातही झिरपलामायक्रो स्वरूपातल्या  घडलेल्या  ह्या बदलापूर्सावी मराठी मनांची मशागत विठ्ठलरूपाने रूपाने पंढरपुरात विटेवर उभा असलेला श्रीकृष्णशिवाजीमहाराजटिळक-आगरकर आणि फुले-आंबेडकर तसेच वाघिणीचे दूध ठरलेली इंग्रजी भाषेने केलीजाखोटियांच्या कादंबरीतली कथा ओघवत्या शैलीत पुढे सरकत जातेती वाचताना बदल’ ही कादंबरी केव्हा संपली हेही लक्षात आले नाही!

Time changes. Nay, it is the Change that denotes the time! आपण नेहमी म्हणतोकाळ बदललापरंतु ते खरे नाही.  काळ तर अनंत आहेअनादी आहेवस्तुस्थिती अशी आहे की अनेक बदल घडलेले आपण पाहतोआणि म्हणतोकाळ बदलला !  हे वाक्य मी कुठे वाचलं हे मला  आता आठवत नाहीअर्थात ते आठवत नसलं तरी त्या वाक्यानं मी भारावून गेलो होतोडॉगिरीश जाखोटिया ह्यांची बदल’ ही कादंबरी वाचताना मला ह्या वाक्याची प्रचिती आलीबजाज मॅनेजमेंट कॉलेज ह्या नामवंत संस्थेत १० वर्षे प्राध्यापकी करता करत ह्या लेखकाने मॅनेजमेंटविषयक स्वतःचे असे तत्त्वज्ञान निर्माण केलेनुसतेच तत्तवज्ञान नाही तर ते समाजाधिष्ठित कसे राहील ह्याचाही सखोल विचार केलाहा विचार प्रत्यक्षात कसा आणता येईल हे त्यांनी कादबंरीच्या माध्यमातून  समर्थपणे दाखवून दिलेकादंबरीतील सगळ्या व्यक्तींच्या मनोव्यापारात  चाललेली घालमेलही त्यांनी टिपलीती टिपत असताना त्यात गुंतून  पडता मनात उमटलेल्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक  उत्तरही त्यांनी शोधलेकादंबरीचे कथानक विश्वव्यापी ठेवल्याने कादंबरीला मोठेच परिमाण लाभले.
कॉर्पोरेट कंपनीपासून ते कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेत काम करणा-या व्यक्ती  ह्या कथेत येतातत्यांच्या मनात सुरू झालेली घालमेल लेखकाने टिपली आहेकथा सोलापूर जिल्ह्यातील सांडव ह्या खेड्यापासून  ते न्यूयॉर्क-पॅरीसपर्यंत कुठेही उलगडतेमनोलिश्लेषणाच्या खोल पाण्यान  शिरता लेखकाने ती हळुवारपणे उलगडली आहे !  कधी ती मुंबई-पुण्यातील मोठ्या फ्लॅटमध्येही घडतेकथेचा पसारा जपानपासून इथोपियापर्यंत अनेक देशात पसरलेला आहे.  ह्या कथेतील बहुतेक व्यक्तींचे प्रेरणास्थान कृष्णशिवाजीकिंवा फुले-आंबेडकर ह्यापैकी कुणीतरी एक आहे.  शंभर वर्षांहूनही अधिक काळ महाराष्ट्रात वास्तव्य करणा-या आणि मराठी समाजात मिसळूनगेला तरी  घरात थेट घूंघटमध्ये वावरणा-या मारवाडी स्त्रियांपासून ते डोईवर पदर घेतल्याशिवाय बैठकीत  येणा-या शहाण्णव कुळी मराठा स्त्रियाही ह्या कादंबरीत वावरतातविशेषतः गेल्या पन्नास वर्षांत घडणा-या बदलास त्या कशा प्रकारे सामो-या गेल्या ह्याचे मनोज्ञ दर्शन लेखकाने घडवले आहेमराठामुसलमानआंबेडकरवादीमारवाडीचित्पावन इत्यादि विविध जातींधर्माच्या जन्मजात  मर्यादा त्या व्यक्ती सहज ओलांडतातस्वतःच्या स्वभावाच्या कंगो-यांना छेदही देतातपरिस्थितीतून धाडसी मार्ग काढतात आणि त्यांचे इप्सित साध्य करून घेतातबदल’ कादंबरी वाचताना असे वाटते की  ‘बदलती परिस्थिती’ हीच जणू एक जगड्व्याळ व्यक्ती हीच ह्या कादंबरीतले महत्त्वाचे कॅरॅक्टर आहे !
कादंबरीत घडलेल्या घटना निव्वळ कल्पना विलास नाहीबहुतेक घटना समाजात घडलेल्या आहेतत्या घडत असताना समाजाला धगही जाणवतेविखांडेकरशिवाजी सावंत वगैरे कादंबरीकारांनी रूढ केलेली कादंबरी शैली बाजूला सारून लेखकाने व्यक्तीरेखांचे मन  ‘नॅरेशनच्या माध्यमातून उलगडले आहेनॅरेशनची  ही शैली काहीशी जुनीपुराणी आहे हे खरेपण कादंबरीची मांडणी लक्षात घेता  'नॅरेशन'ची शैली अतिशय चपखल आहेमहत्त्वाचे म्हणजे त्यांनी मनाशी योजलेल्या हेतूशी  त्या शैलीने इमान राखणारी आहे.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: